महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरे मंजूर .. अशा करा अर्ज

आपले स्वतःचं एक घर असावं तर प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांच्या मार्फत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येते. मागील काही वर्षापासून या योजने खंड हा पडला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने पाठपुरवठा करून नवीन २० लाख घरे ही मंजूर करून घेतलेली आहेत .

तरी लेखांमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख तुम्ही संपूर्ण वाचायचा आहे त्याचबरोबर ऑफिशियल जीआर ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.

योजना माहितीतपशील
योजनेचे नावप्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G)
उद्दिष्टग्रामीण भागातील गरिबांसाठी पक्के घर उपलब्ध करणे
सुरुवात वर्ष2016
लाभार्थी पात्रता– ग्रामीण भागातील घर नसलेले किंवा जर्जर घर असलेले कुटुंब- SECC 2011 च्या आधारावर पात्रता
घराचा प्रकार25 चौरस मीटरचा पक्का घर (स्वच्छता सुविधा व शौचालयासह)
घर बांधणीचा खर्च– मैदानी भागासाठी ₹1.20 लाख- डोंगराळ भागासाठी ₹1.30 लाख
सहाय्य देणारे घटक– केंद्र सरकार: 60%- राज्य सरकार: 40%
कामगार सहाय्यमनरेगा अंतर्गत 90 दिवसांचे कामगार सहाय्य
अर्ज प्रक्रियास्थानिक ग्रामसभा किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज
अधिकृत संकेतस्थळpmayg.nic.in
संपर्क क्रमांक1800-11-6446

त्याचबरोबर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज हे कुठे उपलब्ध होणार आहे याची थोडक्यात माहिती आपण येथे समजावून घेणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना थोडक्यात ओळख

ग्रामीण भागातील जनतेसाठी स्वतःच्या घरकुल हे अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात घेऊन नवीन महाराष्ट्र सरकारने वीस लाख घरे ही मंजूर करून घेतलेली आहेत.

यामध्ये घर बांधकाम करण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला एक लाख 40 हजार रुपये पर्यंत मदत ही देण्यात येणार आहे. याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

पात्रता काय असणार आहे

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्रता हे खालील प्रमाणे असणार आहे.

  • लाभार्थी यांच्याकडे कोणतेही पक्के घर नसावे
  • लाभार्थी यांच्याकडे चार चाकी वाहन नसावे
  • लाभार्थी हा सरकारी नोकरीमध्ये नसावा

तर वरील पात्रता ही तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल हे देण्यात येणार आहे.

अर्ज कुठे करावा लागणार आहे

प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज हा तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये करू शकणार आहात त्यासाठी तुम्ही संबंधित ग्रामसेवक किंवा तुमचे ऑपरेटर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अर्ज करून घ्यायचा आहे.

अर्ज करत असताना माहिती ही काळजीपूर्वक भरायला लावायचे आहे मागील सर्वे मध्ये जेव्हा अर्ज हे केले गेले तेव्हा ऑपरेटर यांच्याकडून काही चुकीची माहिती भरल्या गेल्यामुळे बरेच कर्ज हे बाद ठरवलेले होते.

त्यामुळे तुमचे कर्ज हे बरोबर भरलेले आहेत का नाही याची खात्री करायची आहे.

कागदपत्रे कोणती लागणार आहेत

  • आधार कार्ड
  • जॉब कार्ड
  • फोटो
  • बँक पासबुक
  • पडक्या घराचा फोटो
  • पक्के घर नसल्याचे दाखला

तर मित्रांनो वरील प्रमाणे कागदपत्रे ही तुम्हाला सादर करायचे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधायचा आहे.

तर मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना जर काही अडचणीत असतील तर तुम्ही गटविकास अधिकारी यांच्याशी सुद्धा चर्चा करू शकणार आहात त्याचबरोबर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही खाल्ली कमेंट करून नक्कीच प्रश्न विचारू शकता व तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *